चिकोत्रा धरण पुर्ण भरण्यासाठी आरळगुंडीच्या पठारावर आणखी दोन बंधारे बांधणार : समरजितसिंह घाटगे यांची माहिती

सेनापती कापशी :
सेनापती कापशी परिसरासाठी वरदान ठरणारे चिकोत्रा धरण कमी पाऊस झाला तरी पूर्ण क्षमतेने भरावे यासाठी राजे फाउंडेशन च्या माध्यमातून आरळगुंडी पठारावर आणखी दोन बंधारे बांधण्यात येणार असून चरिद्वारे हे पाणी चिकोत्रा धरणामध्ये वळीवणार आहोत , अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली .
आरळगुंडी पठारावरील पावसाचे वाया जाणारे अतिरिक्त पाणी चिकोत्रा धरणामध्ये आणखी कसे वळवता येईल जेणेकरून हे धरण दरवर्षी 100 टक्के भरेल यासाठी शनिवार दि 27 रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष बांधनेत येणाऱ्या बंधारा साईट ची प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.
याबाबत अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले,चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील इतरत्र जाणारे पाणी धरणाकडे वळविण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत काही बंधारे घालण्याचे नियोजन जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आम्ही केले आहे.
पहिल्या टप्यातील बंधाऱ्यास येणारा सत्तावीस लाख रुपये इतका निधी तत्कालीन पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने व आमच्या पाठपुराव्याने मंजूर केला. त्यापैकी मागील वर्षी आरळगुंडीचे पठारावर बांधलेल्या बंधाऱ्या मुळे मागील वर्षी चिकोत्रा धरण 100 टक्के भरण्यास मदत झाली. उर्वरित दोन चरी आता खोदण्याचे व त्या बंधाऱ्याच्या बाजूलाच दुसरा बंधारा बांधनेचे आम्ही नियोजन केले आहे. चालू उन्हाळ्यात या दोन चरी व बाजूचा बंधारा बांधणीचे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.हे काम झाले तर कमी पाऊस झाला तरी चिकोत्रा धरण दरवर्षी 100 टक्के भरेल.त्यामुळे कापशी परिसराचा हा शास्वत प्रश्न कायमचा सुटेल त्यासाठीचाच हा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष उमेश देसाई म्हणाले,चिकोत्रा धरण 100 टक्के भरण्यासाठी आरळगुंडी पठारावरील पावसाचे पाणी धरणाकडे वळीवणे सोपे आहे. मागील वर्षी आम्ही एक बंधारा बांधून चरिद्वारे हे पाणी चिकोत्रा धरणात सोडले तो प्रयोग यशस्वी झाला.सलग दोन वर्षे चिकोत्रा धरण पूर्ण भरले.आमच्या नियोजनाप्रमाणे राजे समर्जीतसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फौंडेशनच्या माध्यमातून आणखी एक बंधारा बांधलेस या विभागात कमी पाऊस झाला तरी भविष्यात हे धरण दरवर्षी 100 टक्के भरेल. व याचा फायदा वन विभागास ही होईल या साईट ची पाहणी करण्यासाठी समर्जीतराजे यांनी येथे भेट दिली आहे.त्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, संजय बरकाळे ,सागर मोहिते वनविभागाचे वनक्षेत्रपाल के .एस आहेर,वनपाल के.एच पाटील,वनरक्षक किरण पाटील ,वर्षा तोरसे,प्रियांका एरुडकर ,दत्तात्रय जाधव यांच्यासह भागातील तीनशेहून अधिक युवा कार्यकर्ते उस्फुर्तपणे भर उन्हात साईटस्थळी उपस्थित होते
कित्ता शाहूंच्या जलनिती अन कतृत्वाचाही..!
समरजितसिंह घाटगे यांनी चिकोत्रा धरण भरण्यासाठी अडथळे ठरू शकणाऱ्या मुद्यांसह करावयाच्या उपाययोजनांबाबत व भविष्यात कायमस्वरूपी हे धरण भरण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत धरणस्थळी रणरणत्या उन्हात पायपीट करत पाहणी केली. व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कोणतेही लोक हिताचे काम करत असताना छत्रपती शाहू महाराज ज्या पद्धतीने त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करीत व निर्णय घेत असत. त्यांच्या जनक घराण्याचे वारसदार असलेल्या श्री घाटगे ही त्यांचेच अनुकरण करीत असून शाहूंच्या जलनीतीसह कतृत्वाचाही कित्ता गिरवित आहेत याची चर्चा उपस्थितामध्ये होती.
पाणी उपलब्धतेसाठी राजेंची धडपड वेगळीच!
भर उन्हात 12 ते 3 या वेळेत राजेनी बंधारा साईट पाहणी केली.त्यानंतर चर खोदनेच्या जागेची पाहणी करणेसाठी पुन्हा एक दीड किलोमीटर पायी चालत जावे लागत होते.वेळ दुपारी अडीचची. राजे चर पहाणेसाठी निघून गेले.याचवेळी उन्हाचा तडाखा सोसवत नसलेने काही कार्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर न जाता सावलीचा आधार घेत झाडाखाली बसले. होते.त्यातील एकजण उस्फुर्त पणे म्हणाला , पाणी उपलब्धतेसाठी राजेंची धडपड काही वेगळीच!
खरच,शाश्वत विकासाबद्धल राजे जे बोलतात ते कृतीतून सिद्ध करतात असे म्हणता क्षणीच उपस्थितानी त्यास टाळ्या वाजवून दाद दिली