पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; हेक्टरी रु 13 हजार 600 ; शिंदे-फडणवीस सरकारचे राजे समर्जीतसिंह घाटगे यांचेकडून अभिनंदन !

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अतिवृष्टी आणि पुरामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये म्हणजेच दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच भरपाईची कमाल या मर्यादा दोन हेक्टर वरून तीन हेक्टर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .
शेतकऱ्याबद्दलच्या या दिलासजनाक मोठ्या निर्णयाबद्दल कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजे समर्जीतसिंह घाटगे यांनी यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
ते म्हणाले,सुमारे अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. या सरकाने शेतकऱ्यांची केवळ थट्टा केली.मागील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात विशेष म्हणजे कागल विधानसभा मतदार संघातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. योग्य नियोजना अभावी काही तालुक्यातुन तर पूरग्रस्त निधी परत गेला.त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.आत्ता शिंदे-फडणवीस सरकार सतेवर येताच पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई देणेचा निर्णय घेतला आहे.
राज्यात नवे सरकार सत्तेवर येतात अनेक चांगले निर्णय होत आहेत.ओबीसी आरक्षण ,पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी करण्याचा निर्णय तसेच प्रोत्साहन अनुदानातील जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय दिलासा देणारे आहेत.
रक्कम दुप्पट………..निर्णय स्वागतार्ह
आज पर्यंत एन डी आर एफ च्या माध्यमातून हेक्टरी सहा हजार आठशे रुपये मदत देण्यात येत होती ती थेट दुप्पट करण्यात आली आहे.
तसेच पात्र ठरविण्यात आलेल्या जमिनीच्या क्षेत्रात वाढ केले ने तीन हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे राज्यातील नव्या सरकारचा हा निर्णय अतिशय चांगला आणि स्वागताहार्य आहे