ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीच्या सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे केडीसीसी बँकेचे कर्जमाफ करा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना साकडे ; जिल्ह्यातील १३ पाणी पुरवठा संस्था ‘१६ कोटी थकित ; संचालकाना कोर्टाची नोटीस तर सचिव, सभासद हे ही कर्जास जबाबदार

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीच्या १३ पाणीपुरवठा संस्था अनेक कारणाने डबघाईला आल्या असून कर्जाच्या विळख्यात अडकल्या आहेत. तर काही संस्था कर्जबाजारी झाल्यामुळे बंद पडल्या आहेत त्यामुळे कर्ज परतफेड करणे शक्य नसून त्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार प्रकाश आबीटकर यांचेकडे सोनाळी (ता.कागल) येथील शेतक-यांनी केली आहे. थकीत असलेल्या संस्थांचे कर्ज फेडण्यासाठी सबंधित संस्थांचे संचालकाना जबाबदार धरण्यात आले असून कोर्टाने वसुलीच्या नोटीस संचालक व मयत संचालकांच्या वारसांना ही लागू केल्या आहेत .त्याचबरोबर सचिव व शेतकरी सभासद यांनाही सदर कर्जास जबाबदार धरण्यात येण्याची शक्यता आहे.

सहकारी तत्वावर शेतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील १३ पाणी संस्थांचे केडीसीसी बँकेकडून सुमारे ७ कोटी १५ लाख रुपयेची कर्ज घेतले होते. त्याचे आतापर्यंत व्याजासहित १६ कोटी ७१ लाख रुपये थकीत कर्जाची रक्कम झाली आहे.

संस्थेनी काटकसर करत कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सध्या संस्था बंद अवस्थेत असल्यामुळे कर्ज फेडणे शक्य नाही . शेतकरी हिताच्या संस्था असल्यामुळे या संस्था सुरु राहणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे हजारो शेतक-यांच्या कुटुंबाना फायदा होवून सर्वसामान्य शेतकरी सुखी होतील. सहकारी शेती पाणी पुरवठा संस्थांची कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यावेळी भूविकास बँक कृती समितीचे अध्यक्ष समाधान म्हातुगडे, माजी सरपंच रामभाऊ चौगले, किसन तेली, बसू कोरे आदी उपस्थित होते.

शेतीस पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थाची वाढलेली वीजबिले, देखभाल दुरुस्ती खर्च, घटलेले उत्पन्नाचे प्रमाण यासारख्या अनेक कारणांमुळे संस्था डबघाईला आल्या आहेत. त्यामुळे शेती पाणी पुरवठा संस्थांची सरकारने कर्जमाफी द्यावी .
– समाधान म्हातुगडे ; ग्रामपंचायत सदस्य, सोनाळी

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks