ताज्या बातम्या
करवीर तालुक्यात सुर्यफुल काढणीस वेग

सावरवाडी ( प्रतिनिधी ) :
करवीर तालुक्यात जानेवारी माहिन्यातील उन्हाळी हंगामाकरिता पेरणी केलेल्या सुर्यफूल या तेल बीयां पीकांच्या काढणीस वेग आला आहे . ऐन लॉकडाऊन काळात शेतीमध्ये सुर्यफूल काढणीसाठी बळीराजाची धांदल उडाली आहे .
यंदाच्या हंगामास सुर्यफलास उत्तम हवामान लाभल्याने सुर्यफूल पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे . या वर्षी विविध सुधारित सुर्यफूल बीयांणाचा शेतकऱ्यानी पेरणी केली . शेतीमध्ये खोडवा ऊस पीक क्षेत्र व मोकळ्या जमिनीमध्ये सुर्यफूलांची लागवड करण्यात आली होती .
बाजारपेठेत गोड्या तेलाचे भाव प्रचंड स्वरूपात वाढू लागल्याने ग्रामीण भागात सुर्यफूल , भुईमुग , या पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे .