ब्रेकिंग : राज्यात पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन.

मुंबई प्रतिनिधी :
पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. त्यातच आता पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. वेगवान वारे वाहणार असून हवेचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं.
राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यातील राज्यात पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा , विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. तर राज्यातील काही भागात चांगलाच जोरदार पाऊस झाला. आता राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. राज्यात पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा , विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला.