ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीसोबत जाणार का ? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले…

मुंबई ऑनलाईन :

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुजरातमध्ये भेट घेतल्यानंतर आता राजकारणात दुसरा अंक सुरू झाला. ‘सर्व काही सांगायचे नसते’ या शहांच्या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक वर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माध्यमांनी याविषयी संवाद साधला.

सध्या राजकीय वर्तुळात शहा आणि पवार यांच्या भेटीवर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. एका गुजराती वृत्तसंस्थेने भेटीचे वृत्त दिल्यानंतर काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट झाली नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात माध्यमांनी पाटील यांना विचारले असता, ”शहा आणि पवार यांच्यात भेट झाली त्याला दुजोरा मिळतोय. पण राष्ट्रवादी पक्षात भेट झाली नसली सांगण्याची स्पर्धा लागली आहे, असे सांगत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला. पण शहांच्या विधानानंतर भेट झाली हे निश्चित अन्यथा शहांनी हे स्पष्टपणे सांगितले असते, असेदेखील पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

तसेच, सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात चर्चा होण गरजेचे असते. राष्ट्रीय स्तरावर या भेटीगाठी होत असतात, असे पाटील यांनी म्हटले आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर माध्यामांनी राष्ट्रवादीसोबत जाणार का असा सवाल केला. यावर ”शहा, जे पी नड्डा, पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील तो मान्य आहे.” असे उत्तर पाटील यांनी माध्यमांनी दिले.

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊनसारखे निर्बंध लावण्याची तयारी करा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. त्यानंतर समाजमाध्यमांमध्ये लॉकडाऊन लागणार अशा वावटळ्या उठू लागल्या. यासंदर्भातही पाटील यांनी माध्यमांशी सवांद साधाला.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. गरिबाचं दुःख मातोश्रीमध्ये बसुन कळणार नाही असे सांगत लॉकडाऊन लावल तरी एक रूपयाचे पॅकेज सरकार देणार नाही. असा थेट आरोप पाटील यांनी केला. तसेच, भाजप पक्षाकडून लॉकडाऊनला कडाडून विरोध असणार आहे. असे पाटील यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks