कोविडमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत अनंतशांती कडून तारळे खुर्द व बरगेवाडी येथे आर्सेनिक गोळ्यांचे वितरण

कुडूत्री प्रतिनिधी :
जागतिक महामारी कोरोनाचा वाढता धोका पाहता लोकांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीत वाढ व्हावी व कोरोनाशी मुकाबला करता यावा यासाठी अनंतशांती सामाजिक बहुउद्देशीय संस्था (महाराष्ट्र राज्य) संचलित कोविड मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत आर्सेनिक गोळ्यांचे वितरण करण्यात येत आहे.याच अनुषंगाने नुकतेच राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी व तारळे खुर्द या गावातील लोकांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक संकटात लोकांना मदत करण्यात संस्थेचा दरवर्षी पुढाकार असतो.
दरवर्षी समाज केंद्र बिंदू डोळ्यासमोर ठेवून अनंतशांती सामाजिक बहुउद्देशीय संस्था वेगवेगळे उपक्रम दर महिन्याला राबवत असते. व लोकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करत असते.आज पर्यंत संस्थेने ज्या ज्या वेळी मानवावर संकटे आली. त्या त्या वेळी संस्थने लोकांच्या साठी पुढाकार घेतलेला आहे.हे काम गेले १३ वर्षे अखंडपणे जोपासले आहे.तर पूर परस्थिती अशा कठीण काळात ५० हून वेगवेगळी शिबिरे घेतलेले आहेत.संस्थेने डोंगराळ, व दुर्गम भाग अशा कार्यक्षेत्रात आपले कार्य सदैव चालू ठेवले आहे. व राज्यात आपला नावलौकिक मिळवला आहे.
बरगेवाडी येथील अकराशे लोकवस्ती असणाऱ्या गावात पत्रकार संदीप बरगे व अनंतशांती चे संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव यांच्या हस्ते वितरण झाले तर तारळे खुर्द येथील पाचशे लोकवस्तीच्या माळवाडी परिसराला पत्रकार विक्रम सरावणे,रामचंद्र सरावणे,भगवान गुरव,सागर लोहार व सुभाष चौगले यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
या कामी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव, डॉ. दिपा कुष्टे, डॉ.नंदिनी गावडे, डॉ.अश्विनी खोराटे, डॉ.माधुरी खोत,अरुणा पाटील,आदींच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.या वेळी पत्रकार सागर लोहार (साके), व अनंतशांतीचे राधानगरी – भुदरगड संस्थेचे अध्यक्ष सुभाष चौगले व बरगेवाडी व तारळे खुर्द येथील महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
दीड लाख लोकांना आर्सेनिक वितरण
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील दीड लाख लोकांना गोळ्यांचे वितरण करणार असल्याचे अनंतशांती चे संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव यांनी सांगितले.