ताज्या बातम्यामहाराष्ट्र
२९ नोव्हेंबरपासून पासून राज्यात पुन्हा पावसाची शक्यता ; ढगाळ वातावरणाने उष्णता वाढली
दक्षिण अंदमानात २९ नोव्हेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे दक्षिण भारतात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण व मध्य महाराष्ट्रात २८ ते ३० नोव्हेंबर या कालवाधित ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

पुणे :
बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यात चार दिवसांच्या खंडानंतर २९ नोव्हेंबर पासून पुन्हा पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरासह श्रीलंका किनारपट्टीवर वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच दक्षिण अंदमानात २९ नोव्हेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे दक्षिण भारतात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण व मध्य महाराष्ट्रात २८ ते ३० नोव्हेंबर या कालवाधित ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.
राज्यात सध्या किमान तापमानात वाढ झाल्याने दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत आहे. बहुतांश शहराचे किमान तापमान १९ ते २१ अंशावर स्थिर आहे. यंदा नोव्हेंबर संपत आला तरीही थंडी न पडल्याने बळीराजा चिंतेत आहे.