ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अबू आझमी भेटल्यानंतर त्यांना वारी आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व समजावून सांगेन : मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात स्पष्टोक्ती

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना वारी आणि वारकरी संप्रदायच समजलेला नाही. मला ते भेटल्यानंतर मी त्यांना वारी आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व समजावून सांगेन, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर मंत्री श्री. मुश्रीफ यांना पत्रकारांनी कोल्हापुरात विचारले असता श्री. मुश्रीफ यांनी हे उत्तर दिले.

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, वारी ही वर्षातून एकदा असते. नमाज हा दिवसातून पाचवेळा असतो. नमाजही आपण अशा ठिकाणी पढली पाहिजे की त्याचा लोकांना त्रास होता कामा नये, असेही ते म्हणाले. वर्षातून एकदाच निघणाऱ्या वारीमध्ये लाखो वारकरी, साधुसंत आणि भाविक सहभागी होत असतात असे सांगतानाच मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, वारीसाठी सरकारने पालखी मार्गही तयार केलेले आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks