सदगुरु श्री. ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकोबारायांच्या दर्शनाने कृतार्थ झालो : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भावना ; देहू येथे जगदगुरु संत तुकोबारायांच्या व आळंदीमध्ये सद्गुरु श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदगुरु श्री. ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकोबारायांच्या दर्शनाने कृतार्थ झालो, अशी भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भावना मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
आज देहूहून आणि उद्या आळंदीहून जगदगुरु तुकाराम महाराज आणि सदगुरु श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. मंत्री श्री. मुश्रीफ आज देहू येथे जगदगुरु संत तुकोबारायांच्या व आळंदीमध्ये सदगुरु श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.
देहू येथील मुख्य मंदीर असलेल्या स्वयंभू श्री. विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात आणि शिळा मंदिरात जगदगुरु तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक झाले. आळंदी येथील सदगुरू संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात संजीवन समाधीवर मंत्री श्री. मुश्रीफ नतमस्तक झाले.
श्री. मुश्रीफ म्हणाले, सदगुरु ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या दर्शनाने कृतार्थ झालो.
यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दोन्हीही संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
देहूमध्ये जगदगुरु श्री. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प जालिंदर महाराज मोरे, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त आणि जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे, ह. भ. प. सचिन महाराज पवार, ह. भ. प. चैतन्य महाराज वाडेकर, पुणे जिल्हा वारकरी महासंघाचे अध्यक्ष विलासतात्या बालवडकर, जेजुरी संस्थानचे विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे आदी उपस्थित होते. आळंदीमध्ये सदगुरू संत श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प. योगी निरंजन नाथ महाराज, विश्वस्त ह. भ. प. चैतन्य महाराज कबीर, ह. भ. प. सौरभमहाराज शिंदे, ॲड. राजेंद्र ऊमाप, विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.
मी कृतार्थ झालो…….!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, हे वर्ष जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या सदैव वैकुंठ गमनाचे ३७५ वर्ष आहे. तसेच; सदगुरु संत श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवाचे ७५० वे वर्ष आहे. दिंडीच्या प्रारंभालाच या दोन्हीही पुण्यस्थळी येण्याचे भाग्य मला मिळाले, मी धन्य आणि कृतार्थ झालो. पंढरपूरची वारी हा सबंध देशातील किंबहुना साऱ्या जगातील सर्वात मोठा परमार्थिक सोहळा आहे. समस्त वारकरी, साधुसंत आणि भाविकांना माझा अंतकरणापासून साष्टांग दंडवत.