ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मेघोली : …अडीच तासांत तलाव झाला रिकामा.

कडगांव :
केवळ अडीच तासांत तलावातील पाणी वेदगंगा नदीत वाहून जाऊन तलाव रिकामा झाला. तलावाच्या पाणी सोडण्याच्या हॉल्वजवळील सुमारे ५० मीटरची भिंत वाहून गेली आहे. पाणी सोडण्यासाठीचा काँकिटचा पिलर फक्त उभा आहे. ओढ्याकाठचे विद्युत पोल पडले आहेत तर शेकडो मोटर पंपांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, गारगोटी- वेसर्डे रोडवरील वेंगरूळ जवळचा पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने या मार्गावरून वेसर्डे, नवले, आजरा या ठिकाणी होणारी वाहतूक बंद झाली आहे.