बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृतीदल समिती गठीत

रोहन भिऊंगडे /कोल्हापूर
दि. 20 : कोव्हिड-19 मुळे दोन्ही पालक गमविलेल्या बालकांच्या संबंधी सुरक्षितेबाबत व दोन्ही पालक गमविलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन व उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृतीदल (Task Force) गठीत करण्यात आलेली आहे. या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे.
या बैठकीतील सदस्य पुढीलप्रमाणे- महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वैशाली हिंगमिरे-बुटाले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर, समन्वय –जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एस.एन. दाते, सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. डी. शिंदे आदिंचा या समितीत समावेश आहे.