मुरगूड मध्ये “हर घर तिरंगा” मोहीमेअंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
केंद्र सरकारच्या “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा”च्या पार्श्वभूमीवर १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत “हर घर तिरंगा” ही जनजागृती मोहीम संपूर्ण देशभर राबवली जात आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून, दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी मुरगूड नगरपरिषेद यांच्या वतीने शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रॅलीची सुरुवात नगरपरिषद कार्यालयातून होऊन ती नाका नं. १ बाजारपेठ लाईन, पोलीस स्टेशन रोड, तुकाराम चौक, गाव तलाव मार्गे पुन्हा नगरपरिषद कार्यालयात समाप्त झाली. या दरम्यान, हातात तिरंगा घेत “हर घर तिरंगा”, “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
रॅलीच्या समारोपानंतर, नगरपरिषद कार्यालयात तिरंगा कॅनव्हास, सेल्फी पॉइंट, तसेच नागरिकांसाठी “घरोघरी तिरंगा जय हिंद” असे संदेश देणारे फलक लावण्यात आले. हा उपक्रम नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना बळकट करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आली.
ही संपूर्ण मोहीम मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. यामध्ये शहरातील नागरिक, वर्गाचा मोलाचा सहभाग लाभला.