बांधकाम कामगारांच्या आपल्या मागण्यासाठी तीव्र लढ्याची गरज : कॉ. शिवाजीराव मगदुम

सावरवाडी प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील सर्व बांधकाम कामगारांनी संघटीत लढा उभारल्या शिवाय न्याय मिळणार नाही असे आवाहन लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड शिवाजीराव मगदुम यांनी केले.
करवीर तालुक्यातील बीडशेड येथील ज्ञान विज्ञान विद्यानिकेतनच्या प्रागणांत सह्याद्री सेन्ट्रींग कॉन्ट्रॅक्टर युनियन तर्फ आयोजित बांधकाम कामगारांच्या आयोजित मेळाव्यात मगदुम बोलत होते अध्यक्षस्थानी माजी सरपंच सुर्यकांत दिंडे होते.
बांधकाम क्षेत्रात बनावट संघटना व एजेंट यांचा सुळसुळाट वाढल्याने फसवणूकीचे प्रकार घडत आहे . जिल्हा प्रशासनाने बनावट संघटना एजेंट यांचा शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. असे सांगुन कॉम्रेड मगदुम म्हणाले घेता बांधकाम कामगार हक्कासाठी संघटीत झाला पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात बोलतांन सुर्यकांत दिंडे म्हणाले बांधकाम कामगारांच्या कौशल्या वर बाधकाम क्षेत्रात गुणात्मक बदल झाले आहे . दर्जा प्राप्त झाले आहे भविष्यात एकसंघ ताकद उभी केली पाहिजे.
मेळाव्यात प्रा व्ही जी खुर्द पवन पाटील शिवाजी कुंभार किशोर आळवेकर राहुल सडोलीकर रवी कांबळे आदिनी मनोगत व्यक्त केली प्रारंभी सर्जेराव कराळे यांनी प्रास्ताविक केले. शेवटी संतोष पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यास करवीर पन्हाळा गगनबावडा तालुक्यातून दोनशे बांधकाम कामगार उपस्थितीत होते.