महे येथे मान्यवर व्यक्तींचा सत्कार समारंभ संपन्न

सावरवाडी प्रतिनिधी :
समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून केलेले कार्य अजरामर राहते . नव्या बदलत्या युगात आदर्श विचाराचा प्रसार होण्यासाठी युवकांचा पुढाकार महत्वाचा असतो .असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले .
करवीर तालुक्यातील महे येथे कै पांडूरंग कांबळे प्रतिष्ठानतर्फ गावातील विद्यार्थी , शिक्षक ,डॉक्टर आदि मान्यवर व्यक्तीच्या आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी नरके बोलत होते . अध्यक्षस्थानी सरपंच सज्जन पाटील होते
यावेळी बोलतांना गोकूळचे संचालक अजित नरके म्हणाले जूण्या पिढीतील लोक हे ध्येयवादी होते . समतेच्या विचारातून एकात्मता प्रकट होते . नव्या पिढीला वैचारिक ज्ञानाची खरी गरज आहे . गावागावात परिवर्तन विचार अभिप्रेत आहेत
कार्यक्रमात सरपंच सज्जन पाटील ,हंबीरराव पाटील , उत्तम वरूटे , दादू लाड , आदिनी मनोगत व्यक्त केले . सागर कांबळे यांनी प्रास्ताविक केले आदित्य पाटील यांनी आभार मानले कार्यक्रमास मोहन पाटील , नामदेव भास्कर , सरपंच सज्जन पाटील , रुपाली बोराटे , सर्जेराव हूजरे , पांडुरंग पाटील ,संभाजी पाटील , पांडुरंग पैलवान, पंडित पाटील , युवराज बोराटे आदि उपस्थित होते .