करवीर तालुक्यात ऊसाच्या पाल्यावर चोरट्यांचा घाला!; बागायतदार ऊस उत्पादक शेतकरी चिंतातूर

सावरवाडी ( प्रतिनिधी ) :
करवीर तालुक्यात शेतीमध्ये उभ्या ऊसाचा पाला चोरून नेण्याच्या प्रकारामुळे बागायतदार शेतकरी चिंतातूर बनला आहे . ऊसाच्या पाल्यावर चोरट्या लोकांचा घाला पडू लागला आहे .पाला चोरीमुळे ऊस पिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊ लागला .पाला चोरट्या लोकांच्यावर कारवाई करण्याची मागणी बागायतदार शेतकऱ्यांनी केली आहे .
ऐन पावसाळा ऋतू ग्रामीण भागात शेतीतील उभ्या ऊस पिकाच्या पाला चोरीचे प्रकार घडत आहे . ऊसाचा पाला चोरून नेण्याचे प्रकार गावागावात घडू लागले आहे . सकाळी पहाटे व दुपारी ,संध्याकाळी , या वेळेत ऊसाचा पाला चोरीचे प्रकार घडतात . ऊसाचा पाला चोरीच्या प्रकाराबाबत चोर पकडण्यासाठी बागायतदार शेतात बसतात . .ऊसाचा पाला चोरट्यावर पोलीस कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे .
दरम्यान ग्रामपंचायत , तंटामुक्त समिती यांनी ग्रामसभा घेऊन ऊसाचा पाला चोरट्यावर दंडात्मक कारवाई करावी अन्यथा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला .
ग्रामीण भागातील तंटामुक्त समितीचा भोंगळ कारभार असून त्याबरखास्त कराव्या अशी मागणी विविध जनसंघटनेतर्फ केली आहे . ग्रामीण भागात शेतजमिनी नसलेल्या अथवा अल्पभूधारक लोकांच्या कडून दुसऱ्याच्या शेतीमध्ये जाऊन ऊसा पिकाच्या पाला, केळीचे घड , नारळ , चोरून नेण्यात चोरट्याची टोळी कार्यरत झाली आहे . प्रकाराला आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे .
भुमीहीन व्यक्ती, दुभती जनावरे मात्र पाच
ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायात भुमीहीन लोकांनी पाच पाच दुभती जनावरे पाळल्याने वैरणीसाठी बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतीतील ऊस पाला चोरून नेला जातो त्यामुळे ऊसाचे उत्पादन घटते .