ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

निव्वळ राजकीय द्वेषापोटी मेघोली धरणावरील कर्मचाऱ्याची बदली; …तर आजचा धोका टळला असता : भाजपा नेते राहुल देसाई

कडगांव प्रतिनिधी :

१ स्पटेंबर २०२१ च्या रात्री साडेदहाच्या च्या दरम्यान सारे शांत असताना भुदरगड तालुक्यातील मेघोली चा लघु पाटबंधारे तलाव फुटला आणि या परिसाराला जबर तडाखा बसला. तलावाची गळती वेळेत काढली नसल्याने हा अनर्थ घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.तलावाच्या मुख्य गेटलाच भगदाड पडले व हा अनर्थ घडला.हा प्रकार रात्री घडल्याने मोठी जिवित हानी टळली पण झालेली ही घटना दुर्दैवी असून या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणारी ठरली असल्याचे मत येथील जाणकार नागरिकांनी व्यक्त केले आहे.

घटनास्थळी भाजपा नेते राहुल देसाई यांनी आज भेट दिली असता त्यांनी या संपूर्ण घटनेला संबधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे सांगितले. जर धरणावरील कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांची बदली प्रशासनाने केली नसती तर आज इतका मोठा फटका शेतकऱ्यांना बसला नसता आणि महिलेचे प्राण देखील गेले नसते, असे ते म्हणाले. निव्वळ राजकीय द्वेषापोटी मेघोली धरणावरील कर्मचाऱ्याची बदली केली असल्याचे देखील त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks