ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीच्या गुणपत्रिका वाटपाचा कार्यक्रम २१ तारखेपासून सुरू होणार

पुणे प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीच्या गुणपत्रिका ((Marksheet)) शनिवार (दि.२१) ऑगस्टपासून देण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठरावीक दिवशीच गुणपत्रिका ((Marksheet)) नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, अशी सूचना राज्य मंडळाने कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या लक्षात घेऊन जास्त वितरण केंद्रे निर्माण करणे किंवा त्याच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडक्यांची संख्या वाढवून गुणपत्रिका वितरित कराव्यात.

विभागीय मंडळाकडून कनिष्ठ महाविद्यालयांना २० ऑगस्ट आणि २१ ऑगस्टला गुणपत्रिका वितरित करण्यासाठी दिल्या जातील.
महाविद्यालयांनी २१ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शासनाच्या नियमांचे पालन करून गुणपत्रिक द्याव्यात.

विद्यार्थ्यांना ठरावीक दिवशीच महाविद्यालयात येऊन गुणपत्रिका घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये, महाविद्यालयांमध्ये पालक-विद्यार्थ्यांची एकाच वेळी गर्दी न होण्याबाबत नियोजन करावे.

तसेच गुणपत्रिका वितरणासाठी केंद्रावर स्थायी लिपीक व शिपाई पाठविण्याबाबत कार्यवाही करावी असे आदेश राज्य मंडळाचे सचिव डॉ. भोसले यांनी विभागीय मंडळाच्या सचिवांना दिले आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks