ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील 2 बंधारे पाण्याखाली; राधानगरीतून 1400 क्युसेक्सचा विसर्ग

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 228.02 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे एकूण 2 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-228.02 तुळशी -93.76, वारणा -877.01, दूधगंगा-631.76, कासारी- 61.25, कडवी -71.24(पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-62.81, पाटगाव 98.35, चिकोत्रा- 40.98, चित्री – 53.30 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.02, घटप्रभा – 37.70, जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ – 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 14.5 फूट, सुर्वे 17.1, रुई 42.6, इचलकरंजी 39.6, तेरवाड 38.5, शिरोळ 30 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 27.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks