ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

जाहिरातबाजीवर राज्य सरकारची १६० कोटींची खैरात : समरजितसिंह घाटगे; कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर!

कागल प्रतिनिधी :

केवळ शब्दांची आतषबाजी करणाऱ्या राज्य सरकारने जाहिरात बाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी करून राज्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केलीआहे.कोरोना,अतिवृष्टी,पूर व वादळांसारख्या संकटात अगोदरच भरडलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी जाहिरात बाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी करून राज्य सरकारने शेतकऱ्यास उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजे समर्जीतसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आघाडी सरकार सत्तेवर आलेनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची गर्जना विधिमंडळात केली, त्याला दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरात कर्जमाफी पडलेलीच नाही. खोट्या जाहिरातींवर एकशे साठ कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी दीडशे कोटी रुपये कर्जमाफीसाठी दिले असते, तर संकटग्रस्त शेतकऱ्यास दिलासा मिळाला असता.तसेच राज्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कर्जमुक्त करण्याची घोषणा करणाऱ्या या सरकारने प्रत्यक्षात मात्र वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकऱ्यास वेठीस धरले आहे, पीकविम्याबाबतही विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्याची फसवणूक केली जात आहे, असा आरोप ही प्रसिद्धी पत्रकात केला.

राज्यातील दीड लाख शेतकरी कुटुंबांना याचा फटका बसत असताना राज्य सरकार मात्र, केवळ पाहणी दौरे करीत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.कर्जबाजारी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा डिसेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यावर कोणतीच कार्यवाही अद्याप झालेली नाही.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks