जिल्ह्यातील २५ बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून ४२५६ क्युसेक विसर्ग

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.76 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 तर सिंचन विमोचकातून 2856 असा एकुण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. वारणा नदी- चिंचोली, माणगांव व खोची. कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा नदी – दत्तवाड व सिद्धनेर्ली. वेदगंगा नदी- वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली असे एकूण 25 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये तुळशी -90.43 दलघमी, वारणा -880.46, दूधगंगा – 626.30, कासारी- 61.25, कडवी -71.24, कुंभी-63.14, पाटगाव 98.27, चिकोत्रा- 40.85, चित्री – 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.65, घटप्रभा – 44.17, जांबरे- 23.23, आंबेआहोळ – 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे – राजाराम 28.08 फूट, सुर्वे 27.10, रुई 57.06, इचलकरंजी 54.06, तेरवाड 47.9, शिरोळ 41.06 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 41.06 फूट इतकी पाणी पातळी सध्या आहे.