सातेरी महादेव पर्यटन स्थळाला प्रदुषणाचा विळखा; कचरा उठाव मोहिमेकडे दुर्लक्ष; पर्यटकांची वाढती वर्दळ.

सावरवाडी प्रतिनिधी :
भौगोलिक टृष्टीकोनातून सह्याद्री पर्वत रांगांच्या अखेरचा टप्पा असलेल्या आणि प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील सातेरी महादेव पर्याटन स्थळाला सध्या प्रदुषणाचा विळखाअधिक घट होतआहे . नैसगिक साधनसंपतीबरोबर ऐतिहासिक पर्याटन क्षेत्रात नव्या बदलत्या युगात वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरणचा प्रश्न निर्माण झाला आहे .
सह्याद्री पश्चिम पर्वतरांगा मध्ये सातेरी महादेव परिसराचा समावेश आहे . डोंगरी प्रदेशात सातेरी व महादेव अशी दोन तीर्थक्षेत्र आहेत . या परिसराला राज्य शासनाने तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त केला आहे .माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या पुढाकाराने सातेरी महादेव परिसरात भक्तनिवास रस्ते दुरुस्ती, वाहनतळ, पाणी वीजपुरवठा , आदि विकास कामांना गेल्या दहा वर्षात शासकिय फंड खर्च केला .
दळणवळण साधनांची सोय झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्याटकांनी गर्दी वाढू लागली आहे . रविवार, सोमवार या दोन दिवसात पर्यटकांची गर्दी प्रचंड असते . शिवाय जंगली वृक्षाच्या ठिकाणी पर्यटकांच्या जेवणावळ्या सुरू असतात.
सातेरी परिसरात मात्र दिवसभर पर्यटकांच्या भोजनाळ्यांचे प्रस्त वाढलेले आहे त्यामुळे दारूच्या बाटल्या , पत्रावळ्या प्लास्टीक पिशव्या अन्नाचे खरकट टाकून देण्याचे प्रकार आलीकडच्या काळात घडू लागले आहे . उघड्या जागी कचऱ्याचे ढीग यांचे साम्राज्य वाढू लागले आहे सातेरी महादेव पर्याटन स्थळावर कोणतीही कारखानदारी नाही . पर्यावणाच्या दृष्टीकोनातून स्वच्छ परिसर असूनही पर्यटकांच्या बेफिरपणामुळे या परिसराला प्रदुषणाचा विळखा घट होऊ लागला आहे.