ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुड : वीजपुरवठा अखंडीत ठेवण्यात कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे : डॉ . श्रीकृष्ण देशमुख

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

वीजे शिवाय प्रकाश व उष्णतेची ऊर्जा मिळत नाही . त्यासाठी वीज कर्मचारी जीव धोक्यात घालून वीज पुरवठा अखंडीत ठेवतात त्यांच्या योगदानाची व वीजेची किंमत वीज खंडीत झाल्यावर समजते . असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय प्रवचनकार हभप डॉ़ श्रीकृष्ण देशमुख यांनी येथील कृतज्ञता कार्यक्रमात केले .

तांत्रीक बिघाडामूळे खंडीत वीज पुरवठा झाल्यावर महापूर काळात जीव धोक्यात घालून पाण्यातूनही वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या व प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या वीज तांत्रीक कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक नागरी सत्कार येथील अंबाबाई देवालयाच्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आला . याप्रसंगी डाॅ . देशमुख बोलत होते माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके ‘ माजी उपनगराध्यक्ष संतोषकुमार वंडकर प्रमुख उपस्थित होते .

धाडसी व प्रामाणिक कामाबद्दल वीज महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता प्रकाश पाटील , प्रधान तंत्रज्ञ भिकाजी चौगले ‘ वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश कोळी , वैभव लोंढे , शहाजी खतकर ‘ सतीश रणवरे , सागर गुजर ;भरत पाटील यांचा तसेच शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वाती शिंदे आदींचा डॉ . श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमात संतोष वंडकर यांनी स्वागत केले .नामदेवराव मेंडके यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमास दत्तात्रय साळोखे ‘ आनंदा कदम , पांडुरंग चौगले , राजू चव्हाण ,महेश खंडागळे , विश्वास रावण , जगदिश गुरव आदि उपस्थित होते . प्रा.सुनिल डेळेकर यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप भारमल यांनी आभार मानले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks