ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशींचा ३१ वर्षापासून सातत्यपूर्ण गणवेश वाटपाचा स्त्युत्य उपक्रम

मुरगूड प्रतिनीधी : विजय मोरबाळे

राष्ट्रीय सणाची तयारी सारीच करीत असतात . मग स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासताक दिन असो. पोलिस , शिक्षक , सरकारी अधिकारी – कर्मचारी आणि विद्यार्थी यांची तयारी चार दिवस आधी पासून सुरू असते. शाळा महाविद्यालये , शासकीय कार्यालये यांचे समोर ध्वजारोहणासाठी पोल रोवणे , तिरंगा ध्वज ईस्त्री करून आणणे या कामा बरोबर विद्यार्थी विद्यार्थिनीची गणवेश खरेदी करणे , कापड असेल तर गणवेश शिवून घेणे , कपडे इस्त्री करणे , डोक्यात माळण्यासाठी फुले गजरे खरेदी करणे , या कामामधे सारे व्यस्त असतात ‘ अशावेळी येथील शिवराज विद्यालयाचे शिक्षक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांची मात्र वेगळीच धावपळ सुरू असते . ते गेली ३१ वर्षे शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून गणवेश वाटप करतात . शाळेतील सह काऱ्यांच्या मदतीने अशा विद्यार्थाचा शोध घेणे आणि त्या विद्यार्थ्यांना कपडे वाटप करणे या कामामध्ये ते व्यस्त असतात .

या वर्षी ही त्यांच्या कडून येथील शिवराज विद्यालय मुरगूड व विजयमाला मंडलिक गर्ल्स स्कूल येथील ३० विद्यार्थी विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी जय शिवराय एज्यु. संस्थेचे कार्यवाह आण्णासो थोरवत, शिवराजचे प्राचार्य पी डी माने , विजयमालाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस बी पाटील, उपमुख्याध्यापक रविंद्र शिंदे , पर्यवेक्षक एस एम कुडाळकर, एस एन् आंगज , यु बी पाटील, ई व्ही आरडे , व्ही बी खंदारे ,ए एम चौगले, एस एस मुसळे, के डी कुदळे , एस एस सुतार तसेच सर्व सौ.एस् जे कांबळे, एस डी देसाई , शोभा पाथरवट, सुरेखा माने, अवंतीका बावडेकर,जी एस डवरी, लता सारंग ,प्रियांका भारमल, ऋतुजा बिरंबळे आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनीं उपस्थित होते .

श्री सुर्यवंशी हे पर्यावरणवादी विचार सरणीचे असून त्यांनी आतापर्यंत त्यांनी वनश्री मोफत रोपवाटीकेच्या माध्यमातून ४ लाख २० हजार रोपांचे मोफत वाटप केले आहे. वृक्षरक्षाबंधन , परीसरातील डोंगरमाथ्यावर बियांची हवाई पेरणी , वृक्षारोपण , पर्यावरण संवर्धनाबाबत व्याख्याने देणे, तसेच दिपावली निमित ऊस तोडणी व खुदाई कामगार भागिनींना भाऊबीज प्रसंगी साडी फराळ ओवाळणीचा कार्यक्रम, संत गाडगेबाबा पुण्यदिना निमीत उपेक्षित कष्टकऱ्यांचे सत्कार व थंडीच्या दिवसात उघड्यावर असणा ऱ्या निराधार निराश्रीतांना ब्लँकेटचे वाटप असे उपक्रम ते स्वखर्चाने प्रतिवर्षी राबवित असतात . अनेक पक्षांनाही त्यांनी जीवनदान दिले आहे. या कार्यामुळे ते झाडमाया , निसर्गमित्र , वृक्षमित्र , पक्षीमित्र , व कृतीशील सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks